स्वप्नातलं सत्य
"काही समजलं का पत्रिका बघून? का होत असेल असं?" हृषीकेश ज्योतिषाचार्य भार्गवांसमोर बसला होता. त्याचे घरगुती गुरुजी. हृषीकेशच्या घरचे भार्गवांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करत नसत. आज हृषीकेशचं वैष्णव घराणं एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराणं म्हणून समाजात वावरत होतं. असं असलं तरीही वैष्णवांकडे अगदी छोट्या छोट्या कामात भार्गव गुरुजींचा सल्ला नेहमीच विचारात घेतला जात असे. तरीही हृषीकेशचा मात्र ज्योतिष विद्येवर अजिबात विश्वास नव्हता. त्याला वाटायचं की, ग्रह-नक्षत्र-तारे वगैरे बघत बसण्यापेक्षा, कष्टावर विश्वास ठेऊन स्वतःच्या हाताने नशीब घडवायचं असतं. यावरून त्याची नेहमीच घरच्यांशी मतमतांतरे होत. आज मात्र घरच्यांच्या सांगण्यावरून, केवळ त्यांच्या समाधानासाठी तो भार्गवांना भेटायला आला होता. पत्रिका भार्गवांसमोर ठेऊन बराच वेळ झाला तरी ते काही बोलत नाही म्हणून न राहवून त्यानं प्रश्न विचारला. भार्गवांनी मान वर करून त्याच्याकडं बघितलं आणि मानेनंच थोडा वेळ थांबायचा इशारा केला. हृषीकेश हाताचे चाळे करत भार्गवांचं पत्रिका वाचन कधी संपतं याची वाट बघत बसला. थोड्या वेळाने भार्गवांनी शांततेचा भंग करत...